|
बाबांचा आग्रह आहे की प्रत्येकाने डोळस श्रद्धा ठेवावी. डोळस श्रद्धेला कोणत्याही बाहय् उपचारांची गरज नसते. ती स्वंयपूर्ण असते. पण बाबांना बौद्धिक तर्कवाद मंजूर नाही. कारण बुद्धिचा वापर आला की मीपणा आला. मीपणा आला म्हणजेच जाणीवपूर्वक प्रयत्न आला, अट्टाहास आला. आणि अट्टाहास म्हणजे सहजयोगाला बाधा. म्हणूनच बाबातत्त्वात अशा तर्कवादाला स्थान नाही. |