भौतिकशास्त्रांचा नियम आहे की कोणीही Matter निर्माण करु शकत नाही किंवा ते नष्ट ही करु शकत नाही. जर लाकूड जाळले तरी त्याची राख राहतेच. तसेच चैतन्य कधीच नष्ट होत नसते किंवा कोणी ते नष्ट करु शकत नाही. आपण आपल्यातील चैतन्याला कैद करतो, मीपणाचे अडसर निर्माण करतो, तरीही ते नष्ट होत नाही. कोणत्या न कोणत्या प्रकारे सवत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देत, आपल्यातच राहते, त्याचा लोप होत नाही. |